Wednesday, July 12, 2023

मिलान कुंदेरा श्रीधर तिळवे नाईक 

मिलान कुंदेरा गेला माझ्या कादंबरीकुळाचा हयात असलेला महाकादंबरीकार गेला 

प्रत्येक कादंबरीकाराचे स्वतःचे म्हणून असे घराणे असते माझे घराणे मराठीत अनुवंशहीन असले तरी जागतिक साहित्यात त्याचा वावर आहे ह्या कादंबरीकुळाचा आदिपुरुष महर्षी व्यास ! भाव , कल्पना आणि विचार ह्यांचा परफेक्ट समतोल साधत स्वतःच्या दार्शनिक अथवा तत्वज्ञानात्मक घोड्यावर परफेक्ट मांड ठोकून संपूर्ण जगभरचा प्रवास भाषेत ट्रान्सफॉर्म करणे हे ह्या कुळाचे आदिम वैशिष्ट्य ! मराठीत भाव आहे तर विचार नाही दोन्ही असतील तर दार्शनिक घोडा नाही तिन्ही असतील तर कल्पनेचा पत्ता नाही असा सगळा घोळ ! साहजिकच मराठीतील एकाही कादंबरीकाराशी माझं जमलं नाही माझ्यावर सुरवातीच्या विद्यार्थी दशेत सखोल प्रभाव पडला तो व्यासांचा आणि कवितेत असाच समतोल साधणाऱ्या ज्ञानेश्वरांचा !

व्यासांची दार्शनिक मांडणी मला कधीच पटली नाही पण त्यांची घौडदौड करण्याची शैली मला पटली पुरोगामी कालखंडातला तर एकही कादंबरीकार मला आवडला नाही मात्र आधुनिक काळात असा कादंबरीकार मला वाटला तो जॉ पाल सार्त्र ! अस्तित्ववादाची पक्की मांड आणि भाव विचार ह्यांचा समतोल त्याच्यात मला आढळला त्यानंतर माझ्या आयुष्यात आला उत्तराधुनिक मिलान कुंदेरा !

The Unbearable Lightness of Being ही माझी त्याची सर्वात आवडती कादंबरी ! आधुनिकतेनं जो The Unbearable heaviness  Being ला दिला होता त्याला लायटर पण गहन करत व्यक्त करण्याची ही शैली मला ज्याम आवडली खरेतर आयुष्याकडे जोक म्हणून पाहायला त्याने पहिल्याच कादंबरीत सुरवात केली अस्तित्वाच्या एकटेपणाऐवजी दुकटेपणावर त्याचा जोर होता “Two people in love, alone, isolated from the world, that's beautiful.”हे तसं भारीच होतं 

त्याने पुरोगामी कादंबरीतला व्यक्तिरेखा उभा करण्याचा मोह कायमच टाळला The Unbearable Lightness of Being मध्ये 

He had first met Tereza about three weeks earlier in a small Czech town. They had spent scarcely an hour together. She had accompanied him to the station and waited with him until he boarded the train. Ten days later she paid him a visit. They made love the day she arrived. That night she came down with a fever and stayed a whole week in his flat with the flu.

अशी वर्णनात्मक सुरवात करत नंतर मग 

And all at once he fancied she had been with him for many years and was dying. He had a sudden clear feeling that he would not survive her death. He would lie down beside her and want to die with her. He pressed his face into the pillow beside her head and kept it there for a long time. Now he was standing at the window trying to call that moment to account. What could ithave been if not love declaring itself to him?

But was it love? The feeling of wanting to die beside her was clearly exaggerated: he had seen her only once before in his life! Was it simply the hysteria of a man who, aware deep down of his inaptitude for love, felt the self-deluding need to simulate it? His unconscious was so cowardly that the best partner it could choose for its little comedy was this miserable provincial waitress with practically no chance at all to enter his life! 

असं काहीतरी येतं 

लेखक असणे म्हणजे सत्य शोधणे हे त्याला नीट कळलं होतं त्याची कल्पनाशक्ती स्वप्नील न्हवती तर फिक्शनल आणि फिलॉसॉफिकल होती साहजिकच कल्पनांची धुळवड उडण्याऐवजी एखाद्या खिडकीची काच पतंग म्हणून आभाळात उंच उडावी तसं काहीसं त्याच्या शैलीत कल्पनेचं व्हायचं वास्तवाचा त्याला तिटकारा न्हवता पण वास्तवाला इंट्रोस्पेक्टिव्ह सेल्फटच देण्यात तो वाकबगार होता बेकेटची मितव्यय शैली त्याने आत्मसात केली होती पण तिचा एकसाचेपणा त्याने टाळला बेकेट काय किंवा कुंदेरा काय दोघेही प्रथम कवी होते आणि त्याचा प्रत्यय गद्यातही दरवळता ठेवण्यात दोघे वाकबगार होते 

उत्तरआधुनिकतेनं केंद्रस्थानी आणलेला आयडेंटिटीचा प्रश्न त्याच्या कादंबऱ्यांत वारंवार येतो आधुनिक अस्तित्वाकडून उत्तराधुनिक आयडेंटिटीकडे झालेला प्रवास अनेकदा त्याच्या पात्रात आढळतो 

ओळखीचा पायाच मुळी मेमरी असतो त्यानेच म्हंटल्याप्रमाणे "The first step in liquidating a people is to erase its memory. Destroy its books, its culture, its history. Then have somebody write new books, manufacture a new culture, invent a new history. Before long that nation will begin to forget what it is and what it was... The struggle of man against power is the struggle of memory against forgetting."

तो आफ्टर अम्नेशियावर बोलत नाही तर अम्नेशिया येऊ नये म्हणून मेमरी सतत जिवंत ठेवण्याची आवश्यकता पटवतो राजकारण नेहमीच मतदारांची मेमरी खतम करून त्यांना नवीन आठवणी पुरवण्यासाठी धडपडत असतं अशावेळी नवीन मेमरीनां जागा देत जुन्या आठवणी जिवंत ठेवणं हा राजकीय लढ्याचा आवश्यक भाग बनतो ब्रिटिशांनी भारतीयांची मेमरी आपल्या हिशेबाने चालवली प्रत्येक साम्राज्यवादी नेता हे करतो अशावेळी आपल्या सांस्कृतिक आठवणी शाबूत ठेवणे फार गरजेचं बनतं कुंदेराच्या कादंबऱ्यात हे सर्व येते करुणा खूप हेवी असते म्हणूनच दुसऱ्याविषयीचे दुःख आपलं अंतःकरण जड करतं “Speak truth to power." असं त्यानं एके ठिकाणी म्हंटल आहेच प्रश्न इतकाच पॉवर बहिरी असेल तर ! निदान मग स्वतःला लक्ष्यात ठेवण्यासाठी तरी पॉवर ऐको न ऐको आपण बोलत राहिलो पाहिजे कला आजच्या काळात स्वतःला लक्ष्यात ठेवण्यासाठी बहिऱ्यांच्यापुढे केलेले संभाषण आहे संप्रेषण आहे 

विलास सारंगांनी आधुनिक दृष्टिकोनातून नॉस्टलजियावर टीका केली होती मिलांन कुंदेरा उलट दिशेनं जातो The Greek word for “return” is nostos. Algos means “suffering.” So nostalgia is the suffering caused by an unappeased yearning to return.” असं म्हणतो आज नॉस्टलजिया स्वप्नरंजन राहिलेला नाही तो रिटर्न ऑफ सफरींग बनला आहे कारण मायग्रेशन झाल्यानंतर नॉस्टलजिया पाठलाग करतो कुंदेरा आपल्या देशातून फ्रान्समध्ये मायग्रेट झाला होता साहजिकच नॉस्टॅलजिया फक्त भूतकाळ नाही तर जे मागे उरलेत त्यांचे काय ह्यांची काळजीही आहे चिंताही आहे 

आईन्स्टाईनने “Weak people revenge. Strong people forgive. Intelligent People Ignore.” असं म्हंटलं होतं आज सोशल मीडिया इंटीलिजन्ट लोकांना इग्नोर करूच देत नाही विशेषतः कम्युनिझममध्ये हे फारच अवघड बनलं होतं आत्महत्येचं सुप्त पोटेन्शियल पदोपदी तुम्हाला आजमावत असताना टिकून राहण्यातच आयुष्य खर्ची पडणं अटळ ! कुंदेराने आपलं आयुष्य कादंबरीत खर्च केलं 

त्याच्या आयडेंटिटी ह्या लघुकादंबरीत दोन वेट्रेसमधील एक संवाद आहे 

At the far side of the room, near the door to the kitchen, two waitresses were deep in discussion. Since she hated to raise her voice, Chantal got up, crossed the room, and stopped beside them; but they were too absorbed by their topic: "I'm telling you, it's ten years already. I know them. It's terrible and there's not a trace. None. It was on TV." The other one: "What could have happened to him?" "Nobody can even imagine. And that's what's horrible."

माहीत नसणं हे एकवेळ ठीक पण काय घडलं त्याची कल्पनाही करता येऊ नये हे जास्त हॉरिबल आहे 

व्यासांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एका युगाच्या अस्ताविषयी बोलतायत सार्त्र आधुनिक युगाच्या अस्ताविषयी बोलतोय तर कुंदेरा कम्म्युनिझमच्या अस्ताविषयी बोलतोय आमच्या पिढीवर  उत्तराधुनिकतेच्या अस्ताविषयी बोलण्याची वेळ आली इरावती कर्वेनीं ह्याला युगांत म्हंटलं होतं हा युगांत ज्यांना पेलायचा आहे त्यांना कुंदेराचे वाचन मस्ट आहे 

श्रीधर तिळवे नाईक 







Saturday, June 24, 2023

 मोदी आणि अमेरिका वारी श्रीधर तिळवे नाईक 

कुठल्याही आंतरराष्ट्रीय भेटीचे चार  टप्पे असतात 

१ डेकोरेशन 

२ निगोशिएशन 

३ अग्रीमेंट करार 

४ पोस्टनिगोशिएशन 

भारतात मीडियाला डेकोरेशनवर चर्चा करायची इतकी सवय झालीये कि बॉलिवूडनंतर सर्वात मोठी एन्टरटेनमेन्ट म्हणून न्यूज चॅनेल्सचा उल्लेख करावा लागेल साहजिकच ह्यावेळींहि डेकोरेशनवर जास्त चर्चा झाली वास्तविक डेकोरेशन हे नेते व देश ह्यांच्या मनात एकमेकांविषयी नेमके काय आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी केले जाते म्हणजे इंदिरा गांधींनी एकदा डेकोरेशनमध्ये रशियाने त्यांच्या पंतप्रधानपदाचा यथोचित सन्मान झाला नाही तर तडक पाठ फिरवली होती (मला त्यांच्या ज्या काही राजकीय कृत्या आवडतात त्यापैकी ही एक आहे ) 

मोदी ह्यांना इंग्लिश येणे न येणे ह्याची चर्चा कलोनियल स्लॅव्हरी दर्शवते अमेरिकन अध्यक्ष येतात तेव्हा भारतीय भाषा शिकून येतात काय ? मुळात मोदींनी इंग्लिशमध्ये बोलायलाच नको होते सरळ हिंदी भाषेत बोलावं दुभाषे शेवटी असतात कशाला ? ज्या भाषेवर आपले प्रभुत्व आहे त्याच भाषेत बोलावे उगाच इंटरनॅशनल इम्प्रेशन मारायला जावे कशाला ?

अल्पसंख्याकांचा प्रश्न पोलिटिकल लेव्हलला त्या त्या देशाची डायमेन्शन घेऊन येतो म्हणजे अमेरिका जेव्हा अल्पसंख्याक म्हणते तेव्हा पॉलिटिकली तिला ख्रिस्चन म्हणायचे असते तर यु ए इ किंवा कतार जेव्हा अल्पसंख्याक म्हणते तेव्हा त्यांना पॉलिटिकली मुस्लिम असं म्हणायचं असतं स्पष्टपणे असं कोणी म्हणत नाही ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात 

मोदी जो करार घेऊन आलेत तो बऱ्यापैकी यशस्वी करार आहे अजूनही आपणाला कोणीही १०० टक्के तंत्रज्ञान देत नाहीये आपण तंत्रज्ञानातं स्वयंभू होणे हाच त्यावरचा उपाय आहे मोदी सरकारांनी त्यासाठी काय केलं ? नेहरूंना शिव्या देणं फार सोपं आहे पण नेहरूंनी ह्याबाबत जेवढं केलं तेवढंही तुम्हांला करता आलेलं नाही ही वस्तुस्थिती ! पुष्पक विमाने उडवून प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी तयार होत नाही ती सतत इन्व्हेन्ट करावी लागते नाहीतर मग तुम्ही आयात करता तशी आयात करावी लागते 

अमेरिकेचे अध्यक्ष काय सांगतात त्यापेक्षा भारतीय पंतप्रधान म्हणून अल्पसंख्याकांचा प्रश्न ते कसे हाताळतात ते इंडियन आणि नैतिक मानकांच्या आधारे ठरवणे शक्य आहे क्रिमिनल प्रोसिजरमध्ये वर्ग धर्म वर्ण जात जमात ह्यापैकी काहीही येता कामा नयेत गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो एखाद्या वर्ग धर्म वर्ण जात जमात केंद्री विशिष्ट ग्रुपमध्ये गुन्हेगारी जास्त असेल तर त्याची समाजविद्यीय चिकित्सा व्हायलाच हवी पण ह्या  चिकित्सेचा आधार समाजविद्येने ठरवलेल्या पुराव्यांच्या आधारे व छाननीनुसार व्हायला हवा त्याऐवजी केवळ एखाद्या ग्रुपला वा समुदायाला म्हणजे एखाद्या धर्माला जातीला वर्णाला टार्गेट करायला म्हणून ती केली जाणार असेल तर औरंगजेब आणि आपण ह्यांच्यात फरक काय उरतो ? सध्या दोन्ही बाजूंनी विवेक गहाण पडलाय का अशीच शंका आहे मोदींनी आधी समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा ते न करता वेळकाढूपणा चालणार असेल तर भाजपला लोकांनी कशाला निवडून दिलंय ह्याचा भाजपला विसर पडलाय असंच म्हंटल पाहिजे . पुरोगामी लोक अजूनही फाळणीपूर्व माहोलमध्ये अडकून पडले आहेत उत्तरफाळणी पोस्टपार्टीशन काळ सुरु झालाय ह्याची त्यांना खबरच नाही एकतर तुम्हाला पूर्ण सेक्युलर व्हावे लागेल किंवा पूर्ण हिंदुत्ववादी ! अर्धंसेक्युलर राहण्याचा कालखंड १९९० साली संपायला सुरवात झालीये आणि २०१४ साली तो पूर्णच संपलाय तेव्हा अमेरिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय साधणार ?माओ त्से तुंगने नेहरूबाबत एकदा म्हंटल होतं कि नेहरूंना इंडिया हा आशियाचा भाग आहे ह्याचा विसर पडलाय असं दिसतंय . पुरोगामी लोकांची हीच स्थिती आहे आपण भारतात राहतोय ह्याचा त्यांना विसर पडलाय 

श्रीधर तिळवे नाईक 



Sunday, June 4, 2023

 गिरीश मिस्त्री : क्रिएटिव्ह फोटोग्राफीचा प्रवर्तक श्रीधर तिळवे नाईक 


२२ मेला गिरीश कार्डियाक अरेस्टने गेला . भारताचा एक जबरा सररियल फोटोग्राफर गेला . फॅशनचे जग बदलणारा फ्रंट प्रोजेक्शन टेक्नॉलॉजीचा इंडियातील पायोनियर गेला टाइम्स ऑफ इंडियाच्या फोटोग्राफी जर्नलचा पाहुणा संपादक गेला अशियन फोटोग्राफीत १० मोस्ट इन्फ्लुएन्शियल पिपलमध्ये तीन वेळा समावेश असलेला फिलॉसॉफर फोटोग्राफर गेला आणि  मुंबईतील माझा पहिला अथपासून इतिपर्यंत मुंबईकर असलेला मित्र गेला .  त्याच्या मरणाची बातमी त्याची बहीण हेमाद्वारा माझ्यापर्यंत खूपच उशिरा पोहचली . तरीही त्या बातमीतले दुखांश फेरी मारून गेलेच . 

त्याची माझी ओळख माझी मानलेली बहीण कल्पना हिने करून दिली मुळात मी १९८९ ला मुंबईत रहिवासासाठी उतरलो तेव्हा माझ्यासाठी आधार होता तो कल्पना आणि महाडेश्वर कुटुंबीय ह्यांचा ! ही मुंबईतील माझी पहिली फॅमिली ! कल्पनाने मी मुंबईत उतरल्या उतरल्या तिच्या फोर्टच्या  ऑफिसात बोलावले आणि तिच्या बॉसची म्हणजे गिरीशच्या वडिलांची ओळख करून दिली मला येणाऱ्या फ्लॅशेसची चर्चा मी मुंबईत येण्याआधीच पोहचली होती आणि मिस्त्री भविष्य जाणायला उत्सुक होते ते त्यावेळी मुंबईतले नामाकिंत सीए होते तरीही त्यांचे प्रश्न होते मला फ्लॅशेस आल्याने मी बोलत गेलो आणि मला मुंबईतील रहिवासाच्या पहिल्याच दिवशी दुसरी फॅमिली मिळाली 

गिरीश मला भेटायला उत्सुक होता तो वडिलांच्यामुळे ! पाऊणे सहा सहा फूट दरम्यान उंची गोरा रंग ब्रॉड चेहरा भव्य कपाळ सरळ पण मोठे नाक भेदक डोळे त्याला एक टिपिकल पारशी देखणेपण देत होते . तो चालतांना बोलतांना एखाद्या सिंहासारखा असायचा पर्शियन सिंहच बसलाय किंवा चालतोय असं वाटायचं 

कमर्शियल फोटोग्राफर म्हणून त्याने १९८३ ला कामाला सुरवात केली त्याकाळात टेक्नॉलॉजिकल अड्वान्समेंट फार नसल्याने व फोटोशॉप अस्तित्वात नसल्याने फोटोग्राफर्सना खूप ऍक्युरेट आणि प्रिसाईज असणे भाग असायचे ते अपरिहार्य होते तो तसा होताच त्यामुळे शूट करतांना कधीकधी राग नाकावर !

पहिल्या भेटीत कुठल्याही फोटोग्राफरचे प्रश्न असतात तेच त्याने विचारले मी त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीची गॅरेंटी दिली. मी कवी आहे म्हंटल्यावर फ्यूचरॉलॉजी साईडलाईन झाली आणि कलेवर  खोलवर चर्चा सुरु झाली जगातल्या नामाकिंत फोटोग्राफरवर व त्यांच्या कामावर गिरीशची मास्टरी होती त्यामुळे चर्चेला मजा यायला लागली त्याचे स्वतःचे काम त्यावेळी रियॅलिझ्मकडून सररियॅलिझमकडे जाणारे होते त्यामुळे त्यावर चर्चा अटळच होती  

प्रकाशावरचे व शॅडो पॅटर्न्सवरचे त्याचे नियंत्रण असामान्य होते त्याला फोटोग्राफीला पेंटिंगमध्ये कन्व्हर्ट करायचे होते ती हूबेहूबकरणाची कला न राहता पेंटिंगप्रमाणे स्वायत्त कला झाली पाहिजे हा त्याचा ध्यास होता आणि फोटो काढताना तो नेहमीच फोटोला पेंटिंग बनवण्याचा भावनेने पछाडलेला असायचा ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीबद्दल त्याला आकर्षण होते आणि ग्रिडींग स्टोनहेंजवरचे त्याचे ह्या काळातले काम असामान्य होते त्याने निर्माण केलेली शेड्सची व्हरायटी ह्या काळात क्वचितच कुणाला साधलेली असेल त्याच्या सररियल कामाला त्याकाळी मिळणारा प्रतिसाद अल्प असला तरी त्याचे काम रिव्होल्यूशनरी आहे ह्याची कल्पना आमच्यासारख्या काहींना होती 

संपादक असतानाही त्याने फोटोग्राफीच्या कमर्शियलइतके कलातत्वालाही  प्राधान्य दिले होते त्याच्या भाषेत फाइन आर्ट टचला !

पुढच्या भेटीत आम्ही अध्यात्माकडे वळलो ईश्वरावर त्याचा विश्वास न्हवता ना मोक्षावर पण बहुदा गुण लागला आणि त्याच्यासाठी योग्य मेडिटेशन्स मला शोधायला लागली त्याच्या फोटोग्राफीत अध्यात्म वाढायला लागलं आणि गणपतीतला व शिवामधला त्याचा इंटरेस्ट कमालीचा वाढला हिंदू मायथॉलॉजीला आधुनिक मांडणीत कसे साकारायचे हा एक प्रश्न बनला एकीकडे इंडस्ट्रियल कमर्शियल फोटोग्राफीला कला बनवण्याचा ध्यास आणि दुसरीकडे मिथ्समधील सनातन आदिबंधांचा पाठपुरावा अशी त्याची फोटोग्राफिक वाटचाल सुरु झाली 

तो मरिनड्राइव्हवर रहायचा आणि मी चर्चगेटला जे एस हॉल होस्टेलला रहायला आलो आणि आमच्या भेटीगाठी वाढल्या फार गुजराती टाईपचं घरचं खायची इच्छा झाली कि अपवादात्मकवेळा मी त्याच्या घरी जेवायलाही जायचो ह्यानिमित्ताने त्याची आई मला अनेक बारीकसारीक प्रश्न मुलांच्या काळजीपोटी विचारायची आणि मी तिला पॉझिटिव्ह बनवायचो ती गुजरातीत प्रश्न विचारायची आणि मी मराठीत उत्तर द्यायचो त्यामुळे हा एक फार इंटरेस्टिंग संभाषणाचा प्रकार असायचा त्याकाळात सगळी मिस्त्री फॅमिली त्यावेळी चैतन्याने झळझळायची त्यामुळे मजा यायची मला गुजराती शिकवण्याचाही तो प्रयत्न करायचा पण तो फेल गेला त्याला मराठी उत्तम समजायची आणि तो चक्क दादा कोंडकेंचा त्याकाळात फॅन होता 

आणि मग एक दिवस ते घडले मला फ्लॅश आला आणि मी अपघात पाहिला काय घडू शकतं ते मी तपशीलवार गिरीशला सांगितलं दुर्देवाने त्याने ते खूप लाइटली घेतले आणि बातमी आली गिरीशला अपघात झालाय 

सर्व ऑपरेशन्स करूनही त्याला व्हीलचेअर टाळता आली नाही सिंह जायबंदी झाला ह्याकाळात मित्र म्हणून त्याच्याबरोबर राहणं मला गरजेचं वाटत असल्याने त्याने कधीही बोलावलं कि मी जात असे त्याला जास्तीतजास्त पॉझिटिव्ह ठेवत असे हळूहळू त्याने नवीन जगणे स्वीकारले पुढचा प्रश्न होता मी एकटाच राहणार कि बायको मिळणार ? कशी मिळणार ?

हा प्रश्न त्याच्या फॅमिलीलाही पडायला लागला त्याचा भाऊ शरद अमेरिकेला सेटल झाला बहीण बहुदा इंग्लंडला आणि दुसरी बहीण हेमा जर्मनीला ! साहजिकच गिरीशची पार्टनर हा चिंतेचा विषय झाला माझ्या सुदैवाने ह्यावेळचा माझा फ्लॅश पॉझिटिव्ह होता आणि त्याला त्याप्रमाणे जोडीदारीण मिळाली ती मराठी होती 

घरसंसार , इस्टेट आणि त्याने काढलेली शरी फोटोग्राफी अकादमी ह्यांच्यात तो हळूहळू बिझी होत गेला आणि कमर्शियल काम हे केंद्रवर्ती बनत चालले माझ्याही आयुष्यात ज्ञ आली भेटींची संख्या घटली त्याचे काम मात्र येत राहिले अपवादात्मकवेळा त्याने बोलावले तेव्हा मी त्याच्या स्टुडिओत गेलोही . तो आत्ताच्या काळावर खुश न्हवता पूर्वी फोटोग्राफर इमेजमेकर होता आता फोटोशॉपच इमेज मेकर आहे असं तो विषादाने म्हणायचा माझ्या मते इंटरनेट वापरून एक नवी इन्स्टॉलेशन टाईप फोटोग्राफी आपण विकसित करणे हा ह्यावर उपाय आहे त्याला ते पटायचं नाही तो ह्याबाबत मनाने साठोत्तरीवालाच राहिला कॉपी पेस्टचा तो क्रिटिक होता ते योग्यच होते सध्याच्या काळात सर्वच कमर्शियल रूथलेस झालंय फोटोग्राफी त्याला अपवाद न्हवती आयफोन आल्यानंतर टच ऑफ क्रिएटिव्हिटी हरवलीय हे आम्हा दोघांनाही मान्य होते पण त्याचा प्रश्न असा होता कि ह्यात टच ऑफ क्रिएटिव्हिटी कसा द्यायचा ? त्याचा प्रयत्न कायम त्या दिशेने चालायचा आणि हे आवश्यक होतं अर्थात कॉपी पेस्टला कला समजणाऱ्या लोकांच्यात हे पटवणे अवघडच होते 

नंतर एका भेटीत मी माझ्या कविता इंग्लिशमध्ये भाषांतरित करत नाही म्हणून तो चांगलाच उखडला अपना आश्रम छोडके बाहर आओ मियाँ म्हणून त्याने खेच खेच खेचली माझे ह्यावरचे म्हणणे मला काही नोबल बिबल मिळवायचे नाही असं होतं ते त्याला पटलं नाही मग मी दोन वर्षे त्याला भेटलोच नाही मग कल्पनाने पुन्हा बोलावले म्हणून गेलो आता प्रश्न स्टुडिओविषयक आणि त्याने काढलेल्या अकँडमीविषयक होते 

नंतर मलाच अपघात झाला मी गेली नऊ वर्षे कधी बेडरिडन कधी पेनकिलर्स घेऊन लेक्चर्स बीडन असा जगत असल्याने भेटी थांबल्या त्यातच माझी श्रवणशक्ती ऑन ऑफ होत होती त्यामुळे समोर भेटून करणार काय असाच प्रश्न होता 

आणि आता बातमी आली ती थेट मृत्यूची ! गिरीश म्हणायचा जाना तो सबको हैं क्या करके जाओगे ये इम्पॉर्टन्ट हैं । गिरीश त्याच्या पाठीमागे असंख्य अव्वल दर्जाची फोटोचित्रे , विक्रम बावा , जिग्नेश झवेरी सारखे अनेक प्रतिभावान विद्यार्थी सोडून गेलाय जी भारतीय फोटोग्राफीच्या इतिहासात नक्कीच इम्पॉर्टन्ट आहेत ! अलविदा मेरे दोस्त ! बडी जल्दबाजी की मेहरबां जाते जाते !

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, February 14, 2023

 व्हॅलेंटाईन डे नंतर श्रीधर तिळवे नाईक 

भावकेन्द्री कविता लिहिणे म्हणजे फक्त रोमँटिक कविता लिहिणे न्हवे प्रबोधनकाळातील भावकेन्द्री कविता रोमँटिसिझमच्या रूपाने अवतरली पण त्याच्याही आधी भावकेन्द्री कविता लिहिली जात होतीच गाथासप्तशतीत कित्येक गाथा ह्या भावकेन्द्री आहेत पण मराठी अभिरुचीला हे समजवणार कोण परिणामी व्हॅलेंटाईन डे ला रोमँटिक कवितेचा महापूर ! वास्तविक आधुनिक भावकेन्द्री कविता कशी लिहायची ह्याचे प्रात्यक्षिक चार्ल्स बोदलेयरने आणि उत्तराधुनिक भावकविता कशी लिहायची हे ऑकटोविया पाझने दाखवून दिल्यावर (पाझच्या प्रभावाखाली येऊनच दिलीप चित्रे वेगळे लिहतात ) किमान मराठी कवींनी तिथपर्यंत तरी यायला हवं होतं पण हे झालं नाही बायका अजूनही रोमँटिसिझमला भुलतात म्हणून हे होतं का ? (पुरुषांचं मला माहीत नाही ते बायकाच सांगू शकतील ) वास्तविक स्वतःच्या प्रेमसंबंधाकडे आणि त्यातील गुंतागुंतीकडे नीट पाहिलं तरी गोष्टी साफ व्हाव्यात इमोशनल होण्याचा अर्थ रोमँटिक होणेच असतो असं नाही अनेकदा रोमँटिक पिंडाचे लोक डॅम्बीस असतात हा माझा अनुभव आहे भावनांच्या आधारे इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि आणि त्याही पुढे जाऊन इमोशनल अत्याचार असंही घडलेलं दिसतं अनेकदा रोमॅंटिसिझमला बळी पडणारे इमोशनल फूल्सही खूप असतात 

भावकेन्द्री असण्याचा खरा अर्थ प्रेम आणि करुणा केंद्रवर्ती ठेवून दुसऱ्याला सेन्सिटिव्हली समजून घेणे , शृंगारिक प्रेमात पडल्यावर स्वातंत्र्याचा एक हिस्सा गमवावा लागतो तो गमावण्याची तयारी ठेवणे , एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे वेळप्रसंगी त्यासाठी कठोर होणे (विशेषतः ह्यात आहार येतो मेडीकॅलिटी येते  ) असा आहे डायबेटीस झालेल्या पार्टनरला प्रेमाने साखरी केक खायला घालणे हे प्रेम न्हवे तर पार्टनरबद्दल निष्काळजीपणा दर्शवतं आणि निष्काळजीपणा करुणेच्या अभावातून येतो 

बाकी मोठमोठ्या गप्पा हाणून चंद्र तारे वैग्रे तोडायची कल्पनाशक्ती अभिव्यक्त करण्याला प्रेम म्हणण्याचे स्वातंत्र्य आहेच लगे रहो रोमँटिक भाई और बहनो 

श्रीधर तिळवे नाईक 



Sunday, August 7, 2022

 पुन्हा एकदा सौष्ठव पण डिजटल श्रीधर तिळवे नाईक 

माणूस मरणाच्या दारात असताना त्याला स्वतःची उरलेली कर्तव्ये दिसत असतात ह्याला मी अपवाद न्हवतो  साहजिकच इतर क्षेत्रांप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रात बाकी असलेली माझी कामे मला दिसायला लागली साहित्याच्या क्षेत्रात दशखंडी तिळवे हा नितीन वाघ व विनायक येवले ह्यांनी डिझाईन केलेला प्रकल्प टाईप व  प्रकाशित करणे धर्म व अर्थ ह्या कादंबऱ्या टाईप व प्रकाशित करणे चौथ्या नवतेच्या मांडणीच्या उरलेल्या जागा भरणे आणि सौष्ठवचे अंक इंटरनेट अर्काइव्जवर डिजीटाईझ करणे वैग्रे 

अनियतकालिकांनी आपली  साईझ व नियमितता नियतकालिकासारखी नियमित ठेवू नये छोटा धमाका करावा व गायब व्हावे हे माझे अनियतकालिकांच्याबद्दल तत्व ! साहजिकच मी जेव्हा असे काही लेखन माझ्या कडे आले तेव्हाच अंक काढला अंक नियमित काढायला गेलात कि साहित्यही पाट्या टाकल्यासारखं वाट्याला येते  म्हणजे मन्या जोशींच्या मला आवडलेल्या २४ कविताच मी घेतल्या त्यावेळी तो फारसा माहीतच न्हवता भुजंगची स्वातंत्र्याचं गाणं हीच कविता मी घेतली अभिजित देशपांडेचे नव्वदनंतरच्या साहित्यव्यवहारावर प्रकाश टाकणारे लेख घेतले ज्ञानदाच्या रोमँटिसिझममधून बाहेर पडलेल्या कविताच मी घेतल्या मंगेश काळेला शक्तिपाताचे सूत्र मध्ये आवाज सापडला असं वाटलं तेव्हाच तो सौष्ठवमध्ये आला हेमंत दिवटे हा तर माझा सहकारी पण त्याच्याही कविता आणि इंटरव्यू थांबताच येत नाही ही त्याचा आवाज अधोरेखित करणारी कविता आल्यावरच सौष्ठव मध्ये आला 

साठोत्तरीचे साहित्य घ्यायचे नाही ह्यावर मी ठाम होतो आणि मला अनेकदा वचन देऊनही नव्या लोकांनी साहित्य दिलं नाही मग रिकाम्या जागा भराव्यात तसा मी अंक माझ्या समीक्षेने भरला मला महत्वाच्या वाटणाऱ्या समकालीनांच्यापैकी सलील वाघ , हेमंत दिवटे , मंगेश काळे , सचिन केतकर ह्यांचे इंटरव्यू आले अभिजीत देशपांडे ,मन्या जोशी व नितीन रिंढे ह्यांचे राहून गेले पण सौष्ठवचा पॅटर्न नंतर हेमंत दिवटेने अभिधानानंतरमध्ये अधिक व्यापक करून इंटरव्यू घेतले आणि एका अर्थाने हे मिशन पुरे झाले नवीन पिढीत संतोष पवार , नितीन वाघ ,  प्रणव सखदेव , ओंकार कुलकर्णी , स्वप्नील वैग्रेंचे असे इंटरव्यू आले पाहिजेत असं वाटतं भुजंग व अरुण काळेला सुरवातीला  चौथी नवता अमान्य होती पण नंतर विचार करावा लागेल असं त्यांना वाटायला लागलं भुजंग आणि मी तो माझ्या हॉस्टलवर आला कि हमखास भेटायचो जगभरच्या आदिवासी साहित्यावर आमच्यात चर्चा व्हायच्या आदिवासी मौखिक साहित्याचे तालन हा आम्हा दोघांच्याही आस्थेचा विषय त्या अंगाने हा इंटरव्यू घ्यायचा वैग्रे खूप चालायचं पण ते घडलं नाही 

मंगेश बनसोड आल्हाद भावसार हे मित्र कायमच सोबत होते मंगेश सहसंपादक होता माझे जे एस हॉलचे महेश म्हात्रें के  श्यामसुंदर ह्यांच्यासारखे हॉस्टेलमेट्स सौष्ठवच्या कायमच मागे होते के श्यामसुंदरचे लेबर्स व लेबर ऍक्ट वरचे काम त्यावेळी सुरु झाले होते जे मला महत्वाचे वाटत होते त्यावर सौष्ठवचा एक इंग्रजी अंक काढायचा प्लॅन होता 

सौष्ठवचा लोगो हा आशुतोष आपटेने तयार केला होता अविनाश धर्माधिकारी ह्यांनी सौष्ठवला जी जागा दिली त्याबद्दल मी कायमच ऋणी राहीन त्याकाळात ते पंतप्रधान किमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे वाटायचे एव्हढी त्यांची पात्रता आहे असं वाटायचं आणि आजही वाटते त्यांना किमान केंद्रात मोदींनी घ्यायला हवं होतं त्यांच्या कित्येक सहकाऱ्यांच्यापेक्षा धर्माधिकारी उजवे आहेत असो भाजपमध्ये टॅलेंट अडवण्याची आणि हलक्या दर्जाची माणसे उंच उडवण्याची एक नवी रीत १९९७ नंतर उदयाला आली आहे धर्माधिकारी त्याचे बळी ठरले पुन्हा असो 

ह्या काळात धर्माधिकारींची  राईट टू इन्फर्मेशन ऍक्टवरची चळवळ सुरु झाली होती जी चौथ्या नवतेच्या दृष्टीने मला फार  महत्वाची वाटत होती  त्यांच्याप्रमाणे आम्हा सर्वांनाच त्यावेळी अण्णा हजारे काही करतील (१९९९ चा काळ )असं वाटत होतं पुढं त्यांनी आंदोलन राष्ट्रीय पातळीवर न्हेलंही पण ते ज्या तऱ्हेने विस्कळीत होत गेलं ते हादरवणारं होतं त्यांचं आंदोलन भाजप स्पॉन्सर्ड होतं वैग्रे बकवास आहे भाजपने ह्या आंदोलनाचा वापर काँग्रेसची सत्ता  संपवण्यासाठी केला एव्हढंच 

धर्माधिकारांच्यामुळेच कीर्तीकुमार  शिंदे , मंदार फणसे , अद्वैत मेहता , राहुल सरवटे असे सुरवातीला सहकारी पण नंतर उत्तम मित्र झालेले लोक ह्याकाळात मिळाले तेराव्या अंकात चक्क राहुल सरवटे व मंदार फणसेची कविता होती हे आता इंटरेस्टिंग वाटते मंदारने नोबल पारितोषिक विजेत्या विस्साव शिंबोस्कीचे भाषणही एका अंकासाठी भाषांतरित केले होते  

माझी विद्यार्थिनी पूजा मून हिच्या सहकार्याने सौष्ठवचे डिजिटाइझ्ड करण्याचे काम पूर्ण झाले हे काम करताना जाणवलेल्या काही गोष्टी विचित्र होत्या म्हणजे मन्या जोशीवरचा अंक हा फक्त त्याच्यावरच आहे हे आता कळलं ह्या अंकाला अभिजित देशपांडेची समीक्षा मिळती तर मजा आली असती  दोन अंक तर कुठं गायब झाले  कुणास ठाऊक ? साहित्यात हिशेब ठेवणे माझ्या बेबंद स्वभावात नाही त्यामुळे माझ्या हजारो  कविता जशा माझ्याकडे चालून आल्या तशे हे अंकही चालून येतील असं म्हणायचं 

सौष्ठवचं काम चौथ्या नवतेचा धमाका करणं हे होतं ते झालं शंकर सारडांनी दैनिक पुढारीमधील एका लेखात प्रस्थापितांच्यात ह्या अंकाने काय झालं होतं ते सांगितलं आहे महेश म्हात्रेने सकाळमध्ये माझा त्यामुळेच इंटरव्यू घेतला होता व आश्चर्यकारकरित्या अरुण म्हात्रे ह्याने प्रस्थापित लोकांची बाजू घेऊन सकाळमध्ये माझा प्रतिवाद केला होता ह्या धमाक्यामुळेच मला शोधत हेमंत दिवटे होस्टेलवर आला मी सौष्ठवचा पहिला अंक ९ फेब्रुवारी १९९३ ला काढला त्याच्यानंतर त्याने अभिधाचा गझल विशेषांक काढला होता पण सौष्ठवचा धमाका झाला आणि हा आला त्या काळात तो गझल विशेषांक काढण्याइतपत रोमँटिक होता पण नंतर बदलला त्याने संपादकपदाची ऑफर दिली मी ती स्वीकारली व  अभिधात गेलो खरेतर त्याने नाव बदलूया असं सांगितलं होतं मी ते ऐकायला हवं होतं असो आम्ही मग दिलीप चित्रे विशेषांक चौथी नवता विशेषांक काढले मात्र एका अंकानंतर जे काही झालं ते अनपेक्षित होतं त्यावर पुढे कधीतरी 

कुठल्याही नवतेचा सहसंवेदनशीलतेमुळे एक गोतावळा तयार होतोच त्यातून वाचायचे कसे हा एक फार मोठा प्रश्न असतो मी दुरावा ठेवण्याचे धोरण स्वीकारून सौष्ठवचा गोतावळा होणार नाही ह्याची काळजी घेतली आणि ती यशस्वीही झाली मात्र इमोशनल बॉण्ड्स आजही ताजे आहेत 

मागच्या नवतेतले लोक तुम्ही आमच्याशी जुळवून घ्या असे सांगतच असतात मलाही नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा परिसंवादात बोलावले गेले एका बाजूला राजन गवस व दुसऱ्या बाजूला मी होतो राजनने देशीवादाचा कट्टर पुरस्कार केला आणि मीही त्याला अनुमोदन द्यावी अशी अपेक्षा असताना मी देशीवाद्यांच्या साहित्य संमेलनात देशीवादावर हल्ला बोल केला परिणामी देशीवादी भडकले व मला शंका आहे कि पॉप्युलर प्रकाशनातील माझ्या पुस्तकांचे प्रकाशन लांबले जे काही पुस्तकांबाबत अजूनही लांबलेलेच आहे. पुढे हेमंत दिवटेमुळे आमच्या पिढीचे अभिधानानंतर प्रकाशनच सुरु झाले  

काहीवेळा आरोप होणे अटळ असते ते माझ्यावरही झाले म्हणजे किशोर कदम मला तू साहित्य क्षेत्रातील शरद पवार आहे असं म्हणायचा (अलीकडे तो मला साहित्यक्षेत्रातील अमित शहा म्हणतो ) मंगेश बनसोडच्या संपादनाखाली आम्ही दलित ह्या शब्दाची व्याप्ती वाढवणाऱ्या अंकाची निर्मिती केली तेव्हाही ही व्याप्ती वाढवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा प्रश्न केला गेला सर्वात जास्त आरोप भुजंग मेश्राम करायचा मी कधी अशा आरोपांच्याकडे लक्ष दिलं नाही माझा आग्रह कुणी डावलला नाही अगदी भुजंग मेश्रामसारखा नाठाळही मी समोर असल्यावर मला विचारल्याशिवाय दारू स्वतःच्या ग्लासात ओतायचा नाही (एकदा त्याची मी दोन तास अडवून चांगलीच पंचाईत केली होती )मात्र मीही फालतू दुराग्रह धरले नाहीत आपण आपलं काम करत रहावं आज ना उद्या तुमचं काम बोलेलच अशी माझी धारणा होती 

सौष्ठवचं बंद पडणं अपरिहार्य होतं मी राहुल सरवटेकडे संपादन दिल्यावर त्याला कोलंबिया विद्यापीठाची ऑफर आली मला जोशी कि कांबळेची ऑफर आली मंगेश बनसोड स्वतःच्या परिस्थितीला मॅनेज करण्यात दंग होता आल्हाद भावसारने मुंबई सोडली होती आणि कीर्ती शिंदेला स्वतःची आयडेंटिटी मेंटेन करायची होती त्यामुळे संपादन चालवणार कोण ? शिवाय कीर्तीने अंक काढण्यापेक्षा पुस्तकप्रकाशन व पुस्तक दुकान चालवणे हे महत्वाचे आहे असा युक्तिवाद केला व तो मला पटला हा युक्तिवाद प्रमाण मानून कीर्तीने नवता प्रकाशन चालू केले व दहिसरमध्ये  ग्रंथदालनही !त्यातून नितीन वाघ सारखे काही लेखक पुढे आणले गेले आता तर सौष्ठव अभिधाची पहिली पिढी थेट अभ्यासक्रमात दाखल झाली त्यामुळे बंड करणे न्हवे तर आपल्याविरुद्ध बंड करणाऱ्या लोकांची वाट पाहणे अपरिहार्य झाले आहे  

प्रत्येक संपादकाला संपादकीय लिहायला लागतात तशी मीही लिहिली त्यातली काही आजही रिलेव्हन्ट वाटतात 

मेडीटेशनची हुक्की आली कि पळ काढणाऱ्या व त्यामुळं झक्की वाटणाऱ्या पण वचन व वेळ पाळण्याबाबत आग्रही व बुद्धी पक्की असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला इतक्या साऱ्या लोकांनी झेललं कसं असाच प्रश्न आता पडतो . एकंदरच भारतीय संस्कृती झक्की माणसांना व चक्कीत जाळ असणाऱ्या व करणाऱ्या माणसांना पेलण्यात व पचवण्यात निपुण आहे असं म्हणायचं . पुन्हा तिसऱ्यांदा असो . (चिन्हकीत असो म्हणजे पूर्णविराम नाही पण पूर्णविराम दाखवावा लागतो अशी पॉलिटिकली करेक्टनेस  प्रोजेक्ट करणारी स्थिती )

श्रीधर तिळवे नाईक 


 




Saturday, June 18, 2022

 पंचांग श्रीधर तिळवे 

काल अकस्मातपणे शैव पुरोहितांच्या प्रतिनिधींचा फोन आला गेली कित्येक दशके मी शैव कॅलेंडरची व पंचांगाची संकल्पना मांडतोय आणि मान्सून गेल्या काही वर्षात केरळात १० ते १५ जून व महाराष्ट्रात १५ जून ते २१ जून ह्या दरम्यान येतोय हे सांगतोय व शेतकऱ्यांनी आपले हिशेब ह्या अंगाने करावेत असं सांगतोय किमान ह्या दिशेने विचार व्हावा अशी मांडणी करतोय 

पूर्वी वळवाचा पाऊस १५ मेच्या आसपास यायचा तो आता २८ मे ते ६ जून दरम्यान येतोय आणि त्यालाच मान्सून समजण्याची चूक होतीये त्या अंगाने गेली दोन वर्षे निरीक्षणे करून झाल्यावर आता तुमच्या संकल्पनेवर काम करूया अशी सूचना आलीये जर ह्या अंगाने वैज्ञानिक निरीक्षणे करून पंचांग तयार झाले तर ते हवे आहे मी श बा दीक्षितापासून लोकमान्य टिळकांच्या पर्यंत अनेकांचे संदर्भ देऊन ह्याबाबत आर्यांच्या नेमक्या कुठे चुका झाल्यात त्या पाहून व दुरुस्त करून  त्या अंगाने काम करूया अशी सूचना दिलीये जी आता स्वीकारण्यात आलीये मीच बरोबर अशी माझी भूमिका नाही पुनर्विचार व्हावा अशी विनंती आहे 

भारतीय शैव हे कायमच पंचांगाचे मास्टर लोक होते पण आठव्या शतकात शैवांची मागपडणी (पीछेहाट) सुरु झाली आणि त्याचा भारतावर विपरीत परिणाम झाला पंचांग हा शहरवासीयांना फक्त मुहूर्ताचा विषय असतो पण गावात शेतीविषयीची कामे त्यावर अवलंबून असतात असो 

आर्य पुरोहितांना जे करायचंय ते करू द्या पण शैव पुरोहितांनी व शैवांनी मोक्ष , विज्ञान, चिन्हविज्ञान तंत्रज्ञान  व चिन्हतंत्रज्ञान ह्या अंगानेच पुढे गेले पाहिजे हे मी ठामपणे मांडतो आहेच  हळूहळू का होईना पण ह्याबाबत जागृती होते आहे हे चांगले लक्षण आहे शैवांच्याकडे विज्ञान तंत्रज्ञानातले तीन चार नोबल लॉरेंट निर्माण होत नाहीत तोवर काही खरं नाही मोक्षदर्शन हा आरंभ असू शकतो पण मुख्य काम विज्ञान चिन्हविज्ञान तंत्रज्ञान चिन्हतंत्रज्ञान ह्याच क्षेत्रात होत असते 

श्रीधर तिळवे नाईक 

तू भेटलास तेव्हा स्थिती थोडी गंभीर होती शैलेन्द्रांच्यामुळे डॉक्टरांकडे गेलो पल्स प्रचंड झाल्याने हे झालंय असं त्यांचं म्हणणं आहे आता थोडा बरा आहे बोलतांना कमी वेदना होतायत 

शैवांची कामं मुख्यतः मौखिक असल्यानेच गप्प आहोत आर्यभट वैग्रे शैवच होते व त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत फलज्योतिषशास्त्रात महेश्वर , काशिनाथ ,वराहमिहीर अशांची मते मिळतात ती पंचांगाशिवाय अस्तित्वात आली असतील काय ? तुला असं म्हणायचंय का गावातला गुरव किंवा जंगम किंवा शैव ब्राम्हण पूर्वी अंदाजपंचे पेरण्याचे मुहूर्त सांगायचे ? माझ्या आजोबांनाच मी हे मुहूर्त काढताना बघितले आहे . ज्योतिष आणि फलज्योतिष हे अनेकदा पूर्वी एकच मानले जायचे अगदी न्यूटनसुद्धा फलज्योतिष अभ्यासायचा  हे तुला माहीत नाही का ? ह्या देशात जसे बौद्धांचे ग्रंथ जाळले गेले तसे शैवांचेही ! श्रीलंका ,चीन , तिबेट मध्ये बौद्ध धर्मग्रंथ मिळाले नसते तर भारतात बौद्धांकडे  काय घंटा पुरावे होते ? आता आता व्हिएतनाममध्ये शैव राजवट असल्याचे आणि तिला नंतर बौद्ध व वैष्णवांनी रिप्लेस केल्याचे पुढे येते आहे . हळूहळू पुरावे पुढे येतीलच पण पुराव्याची वाट पहात आम्ही आता काम करू नये असं तुला म्हणायचंय का ?

ज्याला आसुरी बरं वाटून घ्यायचे असते तो आसुरी बरं वाटून घेतो 

जिथे गोतम बुद्धच कपिल ह्या शैवाच्या खांद्यावर बसलेला आहे तिथे बौद्ध ज्ञानाविषयी काय बोलावे ? ज्याला बौद्ध ज्ञान म्हंटले जाते तिथे तेच मुळी शैवांच्यापासून सुरु होते सूर आर्यांचे ओरिजनल दर्शन एकच मीमांसा बाकी सगळी शैवांची उसनवारी ! चायनीज प्रवासी बौद्ध धर्म स्वीकारूनच आले होते ते बौद्ध धर्माविषयीच आणि बौद्ध धर्माच्या बाजूने बोलणार व बौद्ध ग्रंथ न्हेणार जे नैसर्गिकच आहे . शैव प्रवासी आले असते तर त्यांनी शैव ग्रंथ न्हेले असते बाकी पुराव्याची गोष्ट तर त्यासाठी शैव ग्रंथ वाचायला हवेत 

देशीवादाचा आरोप विनोदी आहे मुळात शंकरानी सांगितलेला शैव असो कि बुद्धाचा बौद्ध हे धम्मच मुळात मार्गी आहेत पंचाग ही गोष्टच मुळात मार्गी आहे जे जे समस्त मानवजातीसाठी सांगितले जाते ते ते मार्गीच असते शंकराच्या काळात समुद्र पर्यटन करतील अशी जहाजे न्हवती त्यामुळे शंकर कधीही जहाजात बसलेला दिसत नाही त्यामुळे भारतीय उपखंड हेच जग होते आणि त्या प्रदेशात शैव धम्म पसरवण्याचा आदेश दिला गेला गौतम बुद्धाच्या काळात आशिया खंड हा जग होता म्हणून आशियाभर बौद्ध धर्म पसरवण्याचा त्याने आदेश दिला ख्रिश्चन व इस्लामच्या काळात आफ्रिका आशिया युरोप माहीत झाले होते म्हणून ह्यांनी त्रिखंड व्यापले पुढे दोन्ही अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंड माहिती झाले म्हणून हेही जगात आले आठव्या शतकानंतर शैव देशीवादी झाले आणि प्रत्याभिज्ञा स्पंद दर्शन काश्मिरी शैवागम झाले सिद्धांत दर्शन तामिळ सिद्ध दर्शन झाले ह्याउलट ह्या काळात शंकराचार्यांनी मार्गी होत वेदांत भारतभर न्हेला देशीवादाने भारताचे विशेषतः बहुजन समाजाचे कायमच नुकसान केले आहे 


थोडक्यात कपिलच्या खांद्यावर गौतम बुद्ध असतो आणि आंबेडकरांनीच हे मांडलेलं असतं मग बुद्ध मूर्तिपूजेच्या विरुद्ध असल्याने शैव उत्पादक वर्गाने बनवलेल्या शंकराच्या मूर्त्यांना बुद्धाच्या मुर्त्या म्हणायचे असते आणि शैवांच्या शिवभक्तीनुसार बुद्धाची भक्ती सुरु करून महायान पसरावयाचे असते शैवांच्या तंत्राला आत्मसात करून पुढचे वज्रयान रचायचे असते शैवांच्यावर टीका करणाऱ्यांना शैव ग्रंथ वा दर्शने वाचण्याची तसदी घ्यायची नसते शैव मंदिरांची आर्किटेक्ट्स ही जिवंत पुरावे असतानाही शैवांना अक्कल नाही असे भासवायचे असते मूळ मुद्द्यावर(इथे मान्सूनच्या तारखा का चुकतायत हा मुद्दा आहे ) भाष्य न करता कुठलेतरी तळातले वाक्य उचलून वादविवादाची लांबड लावायची असते 

आणि मूळ पोस्टमध्ये उद्युक्त केलेले लेखक चर्चेत न आणता कॉमेंट्स पास करायच्या असतात 


एक बौद्ध पंडित  सिद्धाला  म्हणाला ,"मी तुझ्यापेक्षा जास्त जाणतो "

सिद्ध म्हणाला ,"हो "


प्रकृती बिघडलीये प्रज्ञा ठणठणीत आहे मानसिक ताण इमॅजिनेशन्स असतात ते अस्तित्वात नाहीत आपुलकीबद्दल धन्यवाद मित्रवर्य 

सर , पंचांग म्हणजे पाच अंगे ती पुढीलप्रमाणे 

१ ग्रहगती व ग्रहस्थिती 

२ अवकाशबिंदू जसा अयनबिंदू 

३ नक्षत्रस्थिती (ग्रीक लोकांच्यात राशी )

४ तिथी , पक्ष व वार 

५ वर्ष 

पंचांग ऍस्ट्रॉनॉमी ज्याला भारतात ज्योतिष म्हणतात त्याचा भाग आहे ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे फलज्योतिष हे पूर्ण वेगळे आहे व मी मागेच इथे म्हंटल्याप्रमाणे त्याला करमणूक म्हणूनच स्थान द्यावे पाश्चात्य देशात भविष्याचा तार्किक अभ्यास करण्याच्या शाखेला फ्यूचरॉलॉजी म्हणतात त्याला विज्ञान म्हणावे कि नाही किंवा त्याला विज्ञानाचे स्वरूप कसे द्यावे त्यात पूर्वसूचनचा  समावेश करावा कि नाही हा वाद सतत चालत असतो पण त्याचा फायदा असा असतो कि माणसे भविष्यकेंद्री विचार करतात केवळ इतिहासात गोते खात बसत नाहीत मला ह्याच शाखेत बॅचलर व मास्टर डिग्री मिळवायची होती पण भारतात त्यावेळी कुठल्याच विद्यापीठात ही शाखा शिकवली जात न्हवती आणि युरोप अमेरिकेत जाण्यासाठी लागणारा पैसा माझ्या बापाकडे वा माझ्याकडे न्हवता पुढे १९९० साली तामिळनाडू मध्ये ह्या शाखेचा विचार सुरु झाला मात्र मी स्वतःच्या जीवावर ह्या शाखेचा स्वतःच्या अल्पमतीप्रमाणे अभ्यास करत राहिलो कम्युनिझमच्या इतिहासात फक्त चायनाने ह्या शाखेचा वापर १९७२ पासून करायला सुरवात केली आहे बाकी देशांनी तो केला असता तर कदाचित तिथला कम्युनिझम वाचला असता बाकी मार्क्सने दिलेल्या प्रेडीक्शन्सचा विचार आम्ही आर्थिक फ्यूचरॉलॉजीत अधूनमधून करत असतो 

राहता राहिली गोष्ट जगबुडीची ! तर जगबुडीचा मला अनुभव नाही मी जगबुडीविषयी फक्त कथा , दंतकथा ,  कादंबऱ्यांतून सिनेमातून ऐकून व पाहून आहे त्यामुळे जगबुडी होणार कि नाही मला माहित नाही किंवा होणार असेल तर कधी होणार ह्याविषयी मी काहीच सांगू शकणार नाही मला वाटतं तुम्ही हा प्रश्न जगबुडीतज्ञानां विचारावा 

तूर्तास शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या वाया जाताहेत तर त्याला आत्ताचे पंचांग किंवा हवामानशास्त्र जबाबदार आहे का हा माझ्या कन्सर्नचा विषय आहे आणि विज्ञानांत वैयक्तिक मतांना काहीच किंमत नसते त्यामुळे वैज्ञानिक निरीक्षणे करून पंचांगाचा पुनर्विचार करावा का इतकाच प्रश्न मी चर्चेला घेतला आहे एक पेरणी वाया जाणे म्हणजे शेतकऱ्याचे किती श्रम व धन वाया हे आपण कम्युनिस्ट असल्याने सांगण्याची गरज नाही . 





पंचांग म्हणजे कुणी मुहूर्त सांगणारा किंवा जगबुडी सांगणारा ब्राम्हण असा गैरसमज होऊ नये म्हणून हे सांगतो आहे सद्या आपण ख्रिश्चन पंचांग आणि ह्या पंचांगानुसार तयार झालेले कॅलेंडर वापरतो आणि आपल्या ते गावीही नाही . अपवाद काही  इस्लामिक देश ते मात्र इस्लामिक पंचांग वापरतात नासाने स्वतःचे पंचांग डिक्लेअर केलेले आहे पण अजून तरी कुठल्या देशाने ते शास्त्रशुद्ध असूनही स्वीकारलेले नाही असो इथे पंचांग म्हणजे काय ते सांगतो आहे 

ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केलेलं लिखाण )

Thursday, March 10, 2022

 अंदाजानुसार निकाल लागले गोव्यात आपला जास्तीत जास्त दोन जागा मिळतील असाच अंदाज होता सुरेलला जास्तीत जास्त १२ टक्क्यापेक्षा अधिक मते मिळणार नाहीत हे आधीच माहीत होते उत्तर प्रदेशात २७५ सीट्स  भाजप प्लसला  म्हंटल्याने शिव्या खाल्ल्या होत्या (अशाच शिव्या शरद पवारांना विधानसभेत दिल्या तेव्हा खाल्ल्या होत्या पण अंदाज अचूक झाल्यावर शांतता पसरली )पण प्रत्यक्ष निकाल लागल्यावर सॉरी आलं 

पंजाबमध्येही अपेक्षित निकाल लागला प्रश्न असा आहे कि महाराष्ट्रात आप का प्रसार पावत नाही ?मीडियामध्ये बोललं कि पक्षाचा प्रचार होतो अशी समजूत आहे का ?

असो माझ्यादृष्टीने धार्मिक आणि प्रबोधनीक पुरोगामी दोन्ही प्रकार आऊटडेटेड आहेत उत्तराधुनिक पक्ष अस्तित्वात नाही त्याचा पुरेपूर फायदा भाजपला मिळतो आहे चौथ्या नवतेचा एक पक्ष सोडा साधा राजकीय तुकडा पण अस्तित्वात नाही असो 

श्रीधर तिळवे नाईक 

हिंदुत्ववाद किमान १६० वर्षे जुना आहे हे प्रथम लक्ष्यात घ्या श्रीधर तिळवे 

सगळे काव्यसंग्रह आणि अडा हॉका बाणासुना ही कादंबरी सोल्ड आऊट आहे एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या काव्यसंग्रहाची दुसरी बृहद आवृत्ती अलीकडे हस्ताक्षर प्रकाशनाने प्रकाशित केली आहे